Loan Waiver Required Documents : राज्य शासनाकडून नुकतीच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा करण्यात आली असून, प्रशासकीय पातळीवर याच्या अंमलबजावणीला वेग आला आहे. मात्र, या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी शासनाने एका अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्राची अट घातली आहे. हे कागदपत्र वेळेत जमा न केल्यास शेतकरी या मोठ्या लाभापासून वंचित राहू शकतात, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
कोणते आहे ‘हे’ महत्त्वाचे कागदपत्र?
कर्जमाफीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ (Agristack) अंतर्गत ‘फार्मर आयडी’ (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य करण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणे कागदपत्रांचे गठ्ठे गोळा करण्याऐवजी आता याच डिजिटल ‘फार्मर आयडी’च्या आधारे शेतकऱ्यांची ओळख पटवून कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याकडे हा आयडी असणे अत्यंत बंधनकारक आहे.
२० मे पर्यंत मुदत
ज्या शेतकऱ्यांच्या नावावर वैयक्तिक किंवा सामायिक जमीन आहे, अशा अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी आधीच जनरेट झालेले आहेत. मात्र, वनजमीन किंवा इतर आकारपड जमिनी असलेल्या शेतकऱ्यांनी, तसेच ज्यांचे आयडी अद्याप तयार झालेले नाहीत त्यांनी २० मे २०२६ पूर्वी आपले फार्मर आयडी जनरेट करून घेणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अडचणी येत असल्यास मदत कक्ष सज्ज
फार्मर आयडी जनरेट करताना अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत; जसे की पोर्टलवर जमीन न दिसणे किंवा इतर त्रुटी. या समस्येवर तोडगा म्हणून कृषी आयुक्तालयाने आता स्वतंत्र मदत कक्ष सुरू केला आहे. प्रत्येक विभागासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून, त्यांचे संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोणत्याही अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांनी थेट या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली अडचण सोडवावी आणि वेळेत फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
येथे वाचा – 8, 9 मे रोजी याठिकाणी पावसाची शक्यता, पंजाब डख नवीन अंदाज
इतर योजनांसाठीही अनिवार्य
केवळ कर्जमाफीच नाही, तर शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजनांसाठीही हा आयडी गरजेचा असणार आहे. ‘पीएम किसान योजना’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ यांसारख्या योजनांचा पुढील लाभ मिळवण्यासाठी सुद्धा ‘फार्मर आयडी’ सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करता २० मे पूर्वी आपले हे महत्त्वाचे कागदपत्र (फार्मर आयडी) तयार असल्याची खात्री करावी, जेणेकरून शासकीय योजनांच्या लाभापासून त्यांना मुकावे लागणार नाही.

Santosh Kale Patil is the Founder and Chief Editor of Sheti 24 Taas. As a dedicated digital content creator and agricultural journalist from Maharashtra, he specializes in providing authentic daily market rates (Bajar Bhav), crop insurance updates, and vital farming news. His primary mission is to empower the ‘Biliraja’ (farmers) by delivering timely, accurate, and fact-checked information.